केदारनाथ येथे अडकलेले खान्देशातील 50 भाविक सूखरूप!

0

अमळनेर (प्रतिनिधी)  बारा ज्योतीर्लींग मध्ये मुख्य समजल्या जाणाऱ्या “केदारनाथ” उत्तराखंड येथे अमळनेर धुळे, जळगाव, नंदुरबार,सह खान्देशातील ५०  भाविक, अतिवृष्टीमुळे गेल्या ३ दिवसांपासून अडकले होते. ते आज दि १९ रोजी १८ किमी चा पायी प्रवास करून गौरीकूंड येथे सूखरूप परतले आहेत.अमळनेरच्या मॉ गायत्री यात्रा कंपनी तर्फे ४६ प्रवाशी चारधाम यात्रेसाठी दि ७ आँक्टोंबर पासून रवाना झाले होते. दि १७ रोजी गौरकूंड येथून केदारनाथला मंदिरात हेलीकॉप्टरने पोहचले,मात्र हवामानातील बदलामूळे हेलीकॉप्टर सेवा बंद झाली व मूसळधार पावसामुळे रेड अँलर्ट घोषीत झाल्याने सूमारे ६० तासा पेक्षा जास्त वेळ भाविक या ठिकाणी अडकून पडले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या २ वर्षापासून ही यात्रा बंद करण्यात आली होती, यावर्षी सालाबादा प्रमाणे अक्षय तृतीयेला मंदिराचे कपाट (द्वार) ऊघडले मात्र न्यायालयाने या यात्रेवर बंदी केली होती, मात्र काही नियमावली करून चारधाम  यात्रा २० सप्टेंबरला सूरू झाली अमळनेरहून मॉ गायत्री यात्रा कंपनी मार्फत ४६ भाविक आयोजक नरेंद्र सोनार यांचे नेतृत्वात दि ७ ला ऊज्जैन,आग्रा,मथूरा,वृंदावन करून हरिद्वार पोहचले. दि १३ ला हरिद्वारहून ऊत्तरख़ंडातील चार धाम यात्रेला प्रारंभ झाला.गंगोत्री यमूनोत्री केदारनाथ व बद्रीनाथ हे चार धाम असून दि ४ नोव्हेंबरला मंदिर ६ महिन्यांकरिता बंद केले जाते.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव,नाशिक,नंदुरबार,सूरत येथील भाविकांचा यात समावेश होता. या पैकी “केदारनाथ” धाम येथे प्रचंड प्रमाणात पाऊस सूरू झाला, त्यामुळे सर्वत्र मोठ्याप्रमाणात पाणी च पाणी असल्याने व हवामानातील बदलामुळे हवाईदल वाहतूक सुध्दा बंद असल्याने उत्तर महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५०भाविक तेथे अडकून पडले होते उत्तराखंड शासनाकडून करण्यात येणाऱ्या राहूट्या व भोजन व्यवस्था यावर्षी बंद होती. बर्फाच्छादित पर्वतमूळे याठिकाणी खाण्या पिण्याची  व राहण्याची फारशी सोय नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली,उत्तराखंड राज्यातील १३ जिल्ह्यात अतिवृष्टी मूळे भाविक असतील, तेथेच थांबण्याचा सल्ला प्रशासनाने दिला होता.
केदारनाथ मंदिराजवळ अडकलेल्या भाविकांना भूस्सखलन व बर्फवृष्टीच्या भितीने चहूबाजूला पाणी,घनदाट जंगल,कडाक्याची थंडी,  जिओ व्यतीरिक्त कूठल्याही कंपनीची मोबाईलची रेंज नाही,अशा मानसिकतेत जिव मूठीत धरून भाविकांनी २ रात्री अडीच दिवस काढले जिवाचा थरकाप होणाऱ्या अवस्थेत आज दि १९ रोजी सर्व भविक घनदाट जंगलातून १८ कि मी अंतर पायी चालून सूखरूप पोहचल्याने कूटूंबियांसह सर्वांना आनंद वाटला.


▶️ यात्रेचे आयोजक नरेंद्र सोनार यांनी सर्व भाविकांना वेळोवेळी धिर दिला व काळजी घेतली आणी  सूखरूपपणे आम्हाला खाली पोहचवले यामूळे आम्ही सर्व भाविक परमेश्वरासह आयजकांचे आभार मानतो.
रमेश भास्कर निकूंभ अमळनेर
यात्रेकरू भविक


▶️ २५० रूपयात जेवण १ व्यक्तीला राहाण्यासाठा ७०० ते १००० रूपये पाणी बॉटल ५० रू चहा ३० रूपये चमचाभर खिचडी १५० रूपये ५ रूचा बिस्किटचा पूडा  २५ रूपयात अशा अवस्थेत भाविकांनी जे मिळेल त्यावर वेळ निभावून घेतली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!