शिंदे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत,घेतले 6 निर्णय!

मुंबई (वृत्तसंस्था) शिंदे सरकारच्या राज्य मंत्रीमंडळाची बैठक 12 सप्टेंबर पार पडली . मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने 6 मोठे निर्णय घेतले आहेत .
▶️ 12 सप्टेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
⚫ अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार , नागरी सुविधा पुरविण्यासाठी धोरण
⚫ नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता.
⚫ नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय ( वरिष्ठ स्तर ) न्यायालय स्थापन करण्यास मान्यता.
⚫महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या मुंबई , पुणे व नागपूर खंडपीठास मुदतवाढ.
⚫ केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणीकरण करण्यासाठी योजना राबविणार.
⚫ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढणार