ठाकरे सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्तां साठी जाहीर केली, 10 हजार कोटींची मदत!

0

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील ठाकरे सरकारने पूरग्रस्त तसेच अतिवृष्टी बाधितांसाठी आता मोठी मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली. त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.
५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचे राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात आलेल्या पूरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण मदत जाहीर केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.
▶️ अशा प्रकारे होणार मदत
▪️जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
▪️बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
▪️बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!