वृक्ष लागवड काळाची गरज!- जि.प.सदस्या जयश्री पाटील

0

▶️ धानोरा-भोरटेक ग्रामपंचायतीचा बिहार पॅटर्न अंतर्गत साडे सोळा हजार वृक्षलागवडीचा उपक्रम
अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यात बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपणाची मोहीम जोर धरू लागली आहे.यात धानोरा भोरटेक ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेत यावर्षी साडे सोळा हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उपक्रमाची सुरवात जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.दुष्काळामुळे वृक्षलागवड काळाची गरज झाली असून त्यांना जतन करण हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं प्रतिपादन जयश्री पाटील यांनी केलं.
यावेळी सरपंच दिलीप हिरालाल ठाकरे, उपसरपंच अमोल दिलीपसिंग राजपूत, ग्राम रोजगार सेवक संदीप सुभाष राजपूत,ग्रामसेवक नितीन भूपेंद्र राजपूत, ग्रामपंचायत सदस्य गुलाब पाटील, सुनील भिल,नाना भिल,अशोक कडरे, मनोज राजपूत, बन्सीलाल राजपूत, किशोर परदेशी, प्रवीण राजपूत, आकाश कोळी, योगेश राजपूत, कैलास परदेशी अमृत राजपूत,संग्राम परदेशी, संदीप राजपूत,मोहन धनगर,नंदू उत्तम राजपूत, ईश्वर परदेशी,पप्पू धनगर, छबिलाल भिल, हिरामण भिल, अण्णा कडरे,बापुजी नारायण, जय राम भिल,मुकुंदा भिल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!