तलाठी वर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तलाठी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन!

0

अमळनेर (प्रतिनिधी) तलाठी संघटनेच्यावतीने तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन दिले की, दिनांक 22 मे रोजी शनिवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास गंगापुरी गावाजवळ असलेल्या तापी नदी पात्रात अवैध गौणखनिज वाहतुकीस आळा घालण्याकामी उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर आणि तहसीलदार अमळनेर यांच्या सह पथक गेले असता पथकातील सदस्य तथा शहर तलाठी गणेश राजाराम महाजन यांचेसह पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदर घटनेचा अमळनेर तालुका तलाठी संघ जाहीर निषेध करीत आहे ,त्याबाबत 22 मे रोजीच सदर घटनेची फिर्याद अमळनेर पो.स्टे.येथे देण्यात आली असुन अद्यापपर्यंत गुन्हा दाखल होऊन 2 दिवस उलटून सुद्धा आरोपींना अटक झालेली नाही म्हणुन आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत कोविड विषयक आणि नैसर्गिक आपत्ती वगळता लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात येत आहे.
निवेदन देण्यासाठी अमळनेर तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष जी.आर. महाजन ,कार्याध्यक्ष एस ए कुलकर्णी, चिटणीस मुकेश देसले, जिल्हा उपाध्यक्ष वाय .व्ही. पवार, उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, सहचिटणीस पी.पी चव्हाण, संघटक व्ही. पी पाटील ,ऑडिटर वाय. आर. पाटील व संघटनेचे सदस्य उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!